राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये ‘क’ वर्ग नगरपरिषदांचा समावेश
By admin | Published: August 29, 2014 01:54 AM2014-08-29T01:54:54+5:302014-08-29T01:55:36+5:30
पश्चिम वर्हाडात १२१ घरकूले
अमोल जायभाये, खामगाव
राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश केल्यानंतर, या नगरपरिषदांसाठी राज्य शासनाने २0 कोटीचा निधी राखीव ठेवला आहे. या निधीतून पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिलतील क वर्ग नगरपरिषदांना १२१ घरकूले मिळणार आहेत.
राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे राजीव गांधी घरकूल योजना असे नामकरण करतानाच, त्यामध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे पश्चिम वर्हाडास १२१ घरकूले मिळणार आहेत. या योजनेंतर्गत १ कोटी ७८ लाख ८ हजार ७५0 रु. तीन जिल्ह्यांना मिळणार आहेत.
इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना या ग्रामीण भागात राबवण्यात येतात. मात्र शहरी भागातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. बदलत्या काळात शहरीकरण वेगाने झाले. परंतु शहरात नव्याने समावेश झालेल्या भागाचा विकास गतीने होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने या भागातील द्रारिद्रय रेषेखालील नागरिकांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रोजगारासाठी स्थलांतर करुन क वर्ग नगरपरिषदांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी राज्य शासनाने प्रति घरकुलाच्या अनुदानामध्येही वाढ केली आहे. त्यानुसार प्रति घरकूल १ लाख ३८ हजार ७५0 रु. मिळणार आहेत. त्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा ११ हजार २५0 असणार आहे. अशाप्रकारे प्रति घरकु लासाठी १ लाख ५0 हजार रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचे वाटप महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर नगरपरिषदांना होणार आहे.
*राज्यात घरकुले
राजीव गांधी घरकूल योजनेअंतर्गत सन २0१४-१५ मध्ये राज्यातील क वर्ग नगर परिषदांमध्ये १४४१ घरकू ले बांधण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यासाठी १९ कोटी ९९ लाख ३८ हजार ७५0 रु. निधी खर्च करण्यात येणार आहे.