लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठांना संसदीय कार्यकारणीतून बाजुला करत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बदलाची चुणूक दाखवली. अगदीच अडगळीत टाकले असे वाटू नये म्हणून या दोघांचा मार्गदर्शक समितीमध्ये समावेश करण्यात आला.१९९३ नंतर दिलेल्या सगळ्या सगळ्या म्हणजे २१८ कोळसा खाणींचे परवाने सुप्रीम कोर्टाने रद्द केले. कोळसा खाणींचे पारदर्शीपणे पुनर्वाटप करण्याला व ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाचा असलेल्या या प्रश्नाला यामुळे चालना मिळमार आहे. भारताचे माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांनी तर या विषयावर पुस्तक लिहिले.भारताच्या अन्नधान्याच्या अनुदानासंदर्भातल्या भूमिकेवर जागतिक व्यापार संघटनेचा दबाव सहन करणार नसल्याचे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. भारताने या कार्यक्रमाची भारतातल्या गरीबांना अत्यंत गरज असल्याचे पटवून दिले.इंग्लंडच्या दौ-यावर मैत्रीण अनुष्का शर्माला नेण्याची परवानगी देण्यावरून वादळ उठलं. त्यानंतर पत्नी अथवा मैत्रीण किती दिवस विदेश दौ-यावर सोबत राहू शकते याबाबत नियम बनवण्याचा विचार बीसीसीआयने व्यक्त केला.फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांशी पाकिस्तानच्या राजदूतांनी बोलणी केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानशी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. बोलणी एकतर भारताशी करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी असे सांगत भारताने पाकिस्तानविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली.प्रथमच स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलेटप्रूफ काचा काढण्यास सांगितले. मुलींना टोकणारे पालक रात्री अपरात्री भटकणा-या मुलांना आवर का घालत नाहीत असा मुलभूत प्रश्न विचारतानाच मोदींनी स्वच्छ भारत व घराघरामध्ये टॉयलेटसारख्या तळागाळातल्या प्रश्नाला हात घातला.लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीलाटेमध्ये वाहून गेलेले लालूप्रसाद यादव व नितीशकुमार या जुन्या शत्रूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी ज्यांच्यामधून विस्तव जात नव्हता असे लालू व नितीशकुमार एकत्र आले.तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे नेतृत्व आपणच करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोण बॉस आहे याबाबत स्पष्ट सूचना मिळाली.सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनिल दवे यांनी मी जर हुकूमशहा असतो तर पहिल्या इयत्तेपासून भगवदगीता व महाभारत सक्तीचे केले असते असे वक्तव्य केले आणि काँग्रेस व कम्युनिस्ट पार्टीने टीकेची झोड उठवली.