संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:08 PM2018-12-06T23:08:12+5:302018-12-06T23:08:48+5:30

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे.

Orchard with a protected water reservoir! In Satara district 1307 farmers have completed their farming | संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

संरक्षित पाणीसाठ्याने बहरल्या फळबागा ! सातारा जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण

Next
ठळक मुद्दे५ कोटी ३६ लाखांचे अनुदान वाटप

नितीन काळेल ।
सातारा : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. तर या योजनेंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत १३०७ शेततळी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकºयांना ५ कोटी ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत २ हजार शेततळ्यांचे जिल्ह्याला उद्दिष्ट आहे.

शेती हाच जिल्ह्याचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात समृद्धी असली तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तसेच वारंवारच्या दुष्काळाने चारा आणि पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. माण, खटाव तालुक्यांत तर अद्यापही हजारो हेक्टर शेती पाण्याविना पडून आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कमी-अधिक फरकाने अशीच परिसिथती असल्याने पावसाचा आधारच अशावेळी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यातच अलीकडील काळात दुष्काळी तालुक्यातील चित्र पालटू लागले आहे. याला कारण, जलसंधारण व वॉटर कपच्या माध्यमातून झालेले काम. तसेच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे यामधूनही शास्वत पाणी उपलब्ध होत आहे. हे पाणी फळबागांसाठी उपयुक्त ठरत आहे; पण यासाठी पाऊस आवश्यक असून, या तळ्यातील पाणी टंचाई व उन्हाळ्यात गरजेनुसार वापरात येते.

राज्यात २०१६ पासून मागेल त्याला शेततळे, ही योजना सुरू झाली आहे. मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात २ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३०७ शेततळी पूर्ण झाली आहेत. तर ५२ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शासनाकडून १३०७ शेतकºयांना अनुदानापोटी ५ कोटी ३६ लाख १५ हजार ४३७ रुपये देण्यात आले आहेत. तर या योजनेसाठी तब्बल ५०६३ अर्ज आॅनलाईन आले होते. या शेततळ्याला आकारानुसार २६ हजारांपासून ५० हजारांपर्यंत अनुदान मिळते. शेतकºयाच्या नावावर किमान ६० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. मात्र, जादा खर्च शेतकºयांना करावा लागतो.


दुष्काळी तालुक्यात अधिक फायदा...
या शेततळ्यांचा फायदा विशेषत: करून माण, खटाव, फलटणसारख्या दुष्काळी तालुक्यांत अधिक करून होताना दिसतो. पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठते. हे पाणी टंचाईच्या काळात वापरात येते. फळबागांना हे पाणी फायदेशीर ठरते. कारण ठिबकवर असणाऱ्या बागांना हे पाणी पुरवून वापरता येते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी या शेततळ्यावरच उन्हाळ्यातही फळबागा जोपासल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेले आहे.
 

शेततळी पूर्ण आकडेवारी तालुकानिहाय
माण- ३००, फलटण- २६९, खटाव- २२८, कोरेगाव- १७८, खंडाळा- ८१, वाई- ७४, सातारा- ७२, कºहाड-७३, जावळी- १७, पाटण- १२ आणि महाबळेश्वर- ३.

Web Title: Orchard with a protected water reservoir! In Satara district 1307 farmers have completed their farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.