‘रेशीम’चा जिल्ह्याचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर! लागवड क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:06 PM2018-07-26T22:06:26+5:302018-07-26T22:07:01+5:30

'Silk' district is governed by two employees! Planting area will decrease | ‘रेशीम’चा जिल्ह्याचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर! लागवड क्षेत्र घटणार

‘रेशीम’चा जिल्ह्याचा कारभार दोन कर्मचाऱ्यांवर! लागवड क्षेत्र घटणार

Next

सांगली : आर्थिक स्तर उंचाविण्याच्या हेतूने दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि रेशीम शेतीसारख्या शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे. मात्र, जिल्'ात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याऐवजी, ती उद्ध्वस्त करण्याचाच अप्रत्यक्ष डाव शासनाने आखल्याचे दिसत आहे. सांगली कार्यालयात कार्यरत असलेल्या चार कर्मचाºयांची अन्यत्र बदली करण्यात आली असून संपूर्ण जिल्'ाचा कारभार आता केवळ दोन कर्मचाºयांवर अवलंबून आहे. रेशीम विकास अधिकारी या पदाचाही कारभार कोल्हापूरच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्याने सांगली जिल्'ात रेशीम शेती करणाºया शेतकºयांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.

विपरित नैसर्गिक परिस्थिती व बाजारपेठेचा भरोसा नसल्याने शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालनाकडे वळला आहे. त्यातच गेल्या काही वर्षापासून जिल्'ातील शेतकरी रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी करून दाखवित आहेत. अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून रेशीम शेती करता येते. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरात मोठ्या प्रमाणात करता येतो. कमी कालावधित जादा उत्पादनाची हमी असल्याने जिल्'ातील मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळासह संपूर्ण जिल्'ातच थोड्याफार प्रमाणात रेशीम शेती केली जाते.

गेल्यावर्षी ३०० शेतकऱ्यांनी ३२७ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यासाठी १ लाख १५ हजार अंडीपुंजांचे वाटप प्रशासनातर्फे करण्यात आले होते. यातून ७० टन रेशीम कोशाचे उत्पादन झाले. याप्रकारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचा फायदा होत असतानाच, रेशीम संचालनालयाने अचानक ९ पैकी ४ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या, तर एका कर्मचाºयाने स्वेच्छानिवृत्ती घेतली.

आता कार्यरत तीन कर्मचाऱ्यांपैकी एकाकडे प्रशासन व ‘मनरेगा’चे कामकाज असते, तर उर्वरित दोन कर्मचाºयांकडेच जिल्'ाचा कारभार आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून काम करणे जिकिरीचे होणार आहे. यंदा ३८२ एकरवर रेशीम शेतीचा सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, आता कर्मचारीच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरीही रेशीम उत्पादनास नकार देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुन्या चांगले काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नेमणूक देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

जिल्ह्तील रेशीम शेती...
एकूण लागवड क्षेत्र : ३२७ एक र
रेशीम शेती करणारे शेतकरी : ३००
अंडीकोशांचे वाटप : १ लाख १५ हजार
रेशीम उत्पादन : ७० टन

 

Web Title: 'Silk' district is governed by two employees! Planting area will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.