संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:21 AM2019-06-11T00:21:46+5:302019-06-11T00:23:41+5:30

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी

 Arrival at Sanghey in Dindhi, in the direction of Mumbai. - Demand for water supply scheme | संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

पाणीप्रश्नी बालगाव मठाचे तुकारामबाबा महाराज यांनी सुरू केलेली संख ते मुंबई पायी दिंडी सोमवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली.

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यानंतर पुन्हा शेतकºयांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

शुक्रवार, दि. ७ जूनपासून संख येथून तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायथळ कालव्यापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाºया व्हसपेठ तलावात कालव्याद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बुद्रुक, लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कालव्याचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगाव या गावांना होईल. तेथेपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देवनाळ-मेंढेगिरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर, शेड्याळ ओढापात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढापात्रातून दरीकोणूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल. लमाणतांडा, पांढरेवाडी, खंडनाळपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर, जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी, आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ उपस्थित होते.

पूर्व भागात का नाही?
तुकाराम महाराज म्हणाले, कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत पाणी आल्यास आसंगी-तुर्क, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकोंडी या गावांना पाणी जाऊ शकते. जतमधून म्हैसाळचे पाणी जर सांगोला व मंगळवेढ्यास जाऊ शकते, तर जत पूर्व भागात का मिळत नाही?


 

Web Title:  Arrival at Sanghey in Dindhi, in the direction of Mumbai. - Demand for water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.