वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:29 AM2018-01-09T01:29:14+5:302018-01-09T01:29:23+5:30

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.

Government will change over the years! Girish Bapat's government is outraged | वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर

वर्षभरानंतर सरकार बदलणार! गिरीश बापट यांचा सरकारला घरचा अहेर

Next

पुणे : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपले सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढे कोणते सरकार येईल, हे मी सांगू शकत नाही. तुम्हाला काय हवंय ते आताच मागून घ्या, असे धक्कादायक वक्तव्य करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.
डाळिंब उत्पादक संघाच्या वार्षिक अधिवेशनात बापट बोलत होते. बिनधास्त स्वभाव आणि बेधडक वक्तव्यामुळे बापट नेहमीच चर्चेत असतात. डाळिंब उत्पादक शेतकºयांसमोर बोलताना स्वपक्षाच्या सरकारबद्दल साशंकता वर्तविणारी भविष्यवाणी करून बापट चांगलेच अडचणीत आले आहेत.
बापट म्हणाले, पुढे कोणते सरकार येईल; हे मी आताच सांगू शकणार नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. डाळिंब संघाला काय हवंय ते आताच मागून घ्या. पुढचं कोणी बघितलंय! राज्यात कोणतेही सरकार असले तरी शेतकºयांना मदत करणे हे त्याचे आद्यकर्तव्य असते.

Web Title: Government will change over the years! Girish Bapat's government is outraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.