नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:18 AM2018-01-30T03:18:52+5:302018-01-30T03:19:05+5:30

देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनींंच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मा गांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले. यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची.

 Noeng gharajah Global Friends fight against mischief, distant misunderstanding about Mahatma Gandhi | नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ

नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस लढताहेत अपप्रचारांविरुद्ध, महात्मा गांधींविषयीचे गैरसमज दूर करणारी चळवळ

Next

- नम्रता फडणीस
पुणे : देशाची फाळणी झाली ती गांधींमुळे. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले ते गांधींनींंच. पटेल आणि नेहरू यांच्यापैकी महात्मा गांधींनी नेहमीच पंडित नेहरूंना झुकत माप दिले. यांसारख्या अनेक अपप्रचारांमधून समाजात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जनमानसामधून एक चळवळ उभी राहिली ती गांधी समजून सांगण्याची. ‘नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंडस’ या नावाने सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीने अनेकांचे मतपरिवर्तन केले आहे.
फेसबुकवर या चळवळीचे बारा हजार सदस्य तर व्हॉटसअ‍ॅपवर जवळपास पंधरा ग्रुप सक्रिय आहेत. हे सत्यवचनावर मार्गक्रमण करणाºया गांधीजींच्या विचारांचे एका अर्थाने फलितच!
देशाला अहिंसेच्या मार्ग दाखविणाºया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या (मंगळवारी) पुण्यतिथी! त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी एक पिढी देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढे येत आहे. एकविसाव्या शतकात सोशल मीडिया हे जसे संवादाचे माध्यम म्हणून समोर आले तसेच ते अपप्रचार, गैरसमज परविण्याचेही आगार बनले. एखाद्या व्यक्तिबद्दल कुणीतरी काहीतरी सांगते आणि आपल्याला ते खरं वाटते. मग त्यांच्याबद्दल बिनधास्तपणे खोटा प्रचार सुरू होतो. अगदी ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांनाही एका क्षणात निकाली काढले जाते. काहीही माहिती नसताना, त्याची शहानिशा न करता मेसेज पुढे पाठविले जातात आणि मग अपुºया माहितीअभावी अकलेचे तारे तोडत सुरू होते ट्रोलिंग. जनमानसात विशेषत: युवापिढीमध्ये गैरसमजाचे बळी ठरलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते महात्मा गांधी यांचे. महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले योगदान, सत्य, अहिंसा या तत्त्वांवरची त्यांची वैचारिक मांडणी याकडे दुर्लक्ष करून गांधीजींबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले जात आहेत.
चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून हे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी ‘नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस’ नावाने तीन वर्षांपूर्वी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर एक चळवळ सुरू करण्यात आली. युवकांच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याबरोबरच गांधींजींबद्दल सुरू असलेल्या अपप्रचाराला विरोध या चळवळी केला जात आहे.

ट्रोलिंगही रोखणार

- महात्मा गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय केला. त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला लावले. सावरकरांना महात्मा गांधींनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, महात्मा गांधी हुकूमशहा होते, असा अपप्रचार गांधीजींबद्दल केला जात आहे, त्याचा बळी युवा पिढी ठरत आहे.

- सोशल मीडियावर गांधीजींबद्दल अर्वाच्य भाषेत बोलले जाते, ट्रोलिंग केले जाते. म्हणूनच लोकांच्या मनातील गांधीजींबद्दलचे प्रश्न जाणून घेण्याबरोबरच त्याचे निरसन करणे, चर्चा घडविणे, जे सांगत आहोत त्याचे संदर्भ देणे या गोष्टी आम्ही करीत असल्याची माहिती ग्रुपअ‍ॅडमिन उमेश ठाकूर आणि गणेश चोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- लोकांना समजावून सांगतानाही शांत आणि विवेकी मार्गाने आम्ही गांधीजींचे विचार पोहोचवित आहोत. जमेची बाजू म्हणजे या संवादातून आज अनेकांचे मतपरिवर्तन झाले आहे. या ग्रुपमध्ये अगदी हॉटेलमधील वेटरपासून ते माजी केंद्रीयमंत्री तसेच देशविदेशासह
सर्व जातीधर्मांचे लोक आहेत. त्यांना खºया
अर्थाने आज गांधी उमगले असल्याचे त्यांनी सांगितले.

गांधीजींबद्दल अनेकदा टीका करायचो, विनोद करायचो, त्यांच्यावर गाणी तयार केली होती. ती म्हणायचो. गांधीजींनी देशाचे नुकसान केले हे मनात पक्के रूजले होते. लोकांशी देखील गांधीजी किती वाईट होते हे सांगून हुज्जत घालायचो. कोथरूड मध्ये राहायला गेल्यानंतर सोसायटीच्या बाहेर एका स्टॉलवर ’सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक वाचनात आले. फेसबुकवरही काही लोकांना फॉलो करू लागलो, त्यातून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला जॉईन झालो आणि त्या ग्रुपचा आज अ‍ॅडमिनही झालो. आजही गांधी विचारांचे विरोधक आहेत. मात्र आम्ही त्यांच्याशी हुज्जत घालत नाही किंवा त्यांच्या पोस्ट डिलिटही करत नाही. उलट वैचारिक
चिंतनातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.
- गणेश चोंडे, इंटिरिअर डेकोरेटर

Web Title:  Noeng gharajah Global Friends fight against mischief, distant misunderstanding about Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.