कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 11:59 PM2017-10-04T23:59:13+5:302017-10-05T00:06:18+5:30

यवतमाळ : किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली.

सदाभाऊ खोत यांनी मृतक दीपक मडावी यांचे वडील श्याम मडावी, दीपकची पत्नी आणि मुलगी वैष्णवीचे सांत्वन केले.

तसेच, सदाभाऊ खोत यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन भरती असलेल्या विषबाधीत शेतक-यांची विचारपूस केली.

याचबरोबर, सदाभाऊ खोत यांनी दीपक मडावी ज्या शेतावर फवारणी करण्यासाठी गेले होते त्या शेतावर भेट दिली. तसेच, लोणबेहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.