त्यांच्या आनंदापुढे गगन ठेंगणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:36 AM2018-08-31T09:36:08+5:302018-08-31T09:37:55+5:30

जकार्ता, आशियाई स्पर्धाः भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या महिला धावपटूंनी 4 बाय 400 मीटर शर्यतीत सलग पाचवे सुवर्णपदक नावावर केले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावाव केले. या विजयानंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात मावणारा नव्हता...

4 बाय 400 मीटर शर्यतीत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावावर केले.

भारतीय संघ या शर्यतीत पिछाडीवर होता, परंतु त्यांनी बहरीन आणि व्हिएतनाम यांनी पिछाडीवर टाकले.

4 बाय 400 मीटर शर्यतीत भारतीय संघ 0.05 सेकंदाने विक्रम नोंदवण्यात अपयशी ठरले. चार वर्षांपूर्वी भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत 3 मिनिट 28.68 सेकंदाची वेळ नोंदवली होती.

भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ही भारताची 1982 नंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.