नवी मुंबई विमानतळाचं कामकाज केलं ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 09:10 PM2018-02-13T21:10:35+5:302018-02-13T21:14:24+5:30

नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजाच्या ठेक्यापासून पारगाव दापोली ग्रामस्थांना वंचित ठेवल्यामुळे आज संतापलेल्या पारगाव ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाचे कामकाज ठप्प केले.

या वेळी ग्रामस्थच्या सोसायटींना काम द्यावे अशी मागणी केली. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेतला नाही तर नवी मुबई विमानतळाचे काम पुन्हा बंद पाडू असा इशारा देण्यात आला.

यासोबत विमानतळ बाधिंतामध्ये पारगाव वगळण्यात आल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

विमानतळ बाधितांमध्ये पारगावचा समावेश करावा अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.