राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 03:02 PM2018-01-30T15:02:50+5:302018-01-30T15:10:20+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 70 वी पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली होती.

राजघाटावर अनेक दिग्गजांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

सर्वात आधी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहिली.

यानंतर उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणिराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही बापूंना अभिवादन केले.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासहीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही बापूंना आदरांजली वाहिली.