पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाच्या एकत्रीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अस्थिरता आली संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 06:43 PM2017-08-21T18:43:46+5:302017-08-21T18:48:37+5:30

भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते.

या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली.

अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.

उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती.

टॅग्स :भाजपाBJP