म्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:39 PM2018-11-15T20:39:05+5:302018-11-15T20:52:22+5:30

पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो काश्मीरमध्ये, असं म्हटलं जातं. पण भौगोलिक स्थान, राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमध्ये भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळे असे कायदे लागू करण्यात आलेले आहेत.

काश्मीरमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. तसेच काश्मीरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या राज्याची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलते.

येथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानामुळे काश्मीरची राजधानी दर सहा महिन्यांनी बदलली जाते.

हिवाळ्यात काश्मीरची राजधानी सहा महिन्यांसाठी श्रीनगरहून जम्मू येथे हलवली जाते. तर उन्हाळ्याच्या दिवसात उर्वरित सहा महिने काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे असते.

काश्मीरमध्ये या प्रक्रियेला दरबार मुव्ह असे म्हणतात. ही प्रक्रिया ब्रिटिश काळापासून सुरू आहे, मात्र ती अद्याप बदलण्यात आलेली नाही.