आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पुराचे थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 09:16 PM2017-08-15T21:16:05+5:302017-08-15T21:22:07+5:30

आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून अनेक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका गावातील पावसामुळे झालेली परिस्थिती.

बिहारच्या पूर्व चंपारणमधील रामगधवा येथे पुराच्या पाण्यामुळे ट्रक वाहून रस्त्याच्या कडेला गेला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

पश्चिम बंगाल : बलुरघाटमध्ये मुसळधार पावसामुळे पिण्याचे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यातील बलुरघाट येथे मुसळधार पावसामुळे जीवनमान विस्कळीत झाले आहे.

आसाममधील नागाव जिल्ह्यातील जोखलाबंधा येथे पावसामुळे आलेल्या पुरामुळे रेल्वे ट्रॅक खचले आहेत.