एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 02:52 PM2018-10-12T14:52:46+5:302018-10-12T15:06:52+5:30

त्रिची विमानतळावर मोठा अनर्थ टळला,त्रिचीहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं

दुर्घटना घडली त्यावेळेस विमानात 136 प्रवासी होते

या अपघातामुळे वैमानिकानं विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले

सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

तांत्रिक कारणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत

अपघातानंतर सर्व प्रवासी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते

अपघातामुळे विमानाचं प्रचंड नुकसान झाले आहे