बळीराजाच्या मदतीला धावून आले शीख-मुस्लीम बांधव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 12:31 PM2018-03-12T12:31:09+5:302018-03-12T12:31:09+5:30

विविध मागण्यांसाठी बळीराजा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबापुरीत दाखल झालाय. मुंबईमध्ये पोहचलेल्या मोर्चाला समाजाच्या सर्वच स्तरातून मदत केली जात आहे.

आझाद मैदानाच्या परिसरात जात-धर्म न बघता जमियत उलेमा ए महाराष्ट्र या संघटनेकडून पाणी, फळं आणि बिस्कीटांचं वाटप केलं जात आहे.

मुलुंड ते सोमय्या मैदानापर्यंत वस्त्यांमधून मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा-बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या अन्नदात्यांची तहान- भूक भागवण्यासाठी शीख समुदायातील लोकांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले

विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील रहिवाशी, तसेच ‘संत बाबा ठाकर सिंह कारसेवा’, ‘जगदंब प्रतिष्ठान’ यांच्या वतीने मोर्चेकऱ्यांना विविध प्रकारे मदत करण्यात आली.