महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेचा लोकमतच्या सहकार्याने अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 11:26 AM2017-08-22T11:26:46+5:302017-08-22T11:45:46+5:30

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेने लोकमत वृत्तपत्राच्या सहकार्याने आकर्षक पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जातात.

खासगी गाडी, बसमधून प्रवास करताना महामार्गावर होणा-या अपघातांमध्ये अनेक निष्पाप गणेशभक्तांना आपल्या प्राणाला मुकावे लागते.

महामार्गावरुन प्रवास करताना काही संदेश लक्ष वेधून घेतात. त्याच संदेशांना चित्रांची जोड देऊन वाहनचालकांना सर्तक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.