मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी महोत्सव व दख्खन जत्रेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:41 PM2018-02-12T23:41:38+5:302018-02-12T23:49:18+5:30

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा कृषी महोत्सवाचे व दख्खन जत्रेचे उद्घाटन झाले.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा विकास यंत्रणा आणि सांगली जिल्हा परिषद यांच्यातर्फे कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक आदी नेते उपस्थित होते.

प्रगतिशील शेतकरी यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्र्यांनी विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली.

राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने संतोषीमाता, शक्ती (वाळूज), अनुसया (केदारवाडी) या स्वयंसहाय्यता गटांना सन्मानित करण्यात आले.