परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बांगलादेश दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 01:05 PM2017-10-23T13:05:06+5:302017-10-23T13:14:06+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसांच्या बांगलादेशच्या दौ-यावर असून रविवारी (22 ऑक्टोबर)त्या बांगलादेशमध्ये दाखल झाल्या आहेत.

विमानतळावर सुषमा स्वराज यांचे स्वागत करताना परराष्ट्रमंत्री ए.एच. महमूद अली

म्यानमारने रोहिंग्यांना माघारी बोलवून त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे, असे स्पष्ट मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. बांगलादेशच्या भेटीवर असताना स्वराज यांनी हे मत व्यक्त केल्याचे ढाका ट्रीब्यून या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.