तांब्याची भांडी वापरणं आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:39 AM2017-09-15T10:39:08+5:302017-09-15T10:44:49+5:30

तांब्याच्या भांड्यात ८-१० तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाची क्षमता वाढते.

पित्त, अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे.

नेहमी तरुण दिसण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे लाभदायक आहे. यामुळे डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते व चेहरा नेहमी उजळ दिसतो.

दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास यामधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करेल. यामुळे अॅनिमियाचा धोका टळतो.

रोज सकाळ - संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो.

अ‍ॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते.

टॅग्स :आरोग्यHealth