नारळ पाणी पिण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:36 PM2019-04-07T15:36:21+5:302019-04-07T15:41:00+5:30

नारळ पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसेच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते.

काही लोक अंड्यातील पांढरा भाग नारळ पाण्यात मिसळून पितात त्यामुळे शरीराला प्रोटीन्स व कॅल्शिअम मिळतात.

वाढलेल्या वजनापासून त्रस्त असणाऱ्यांसाठी नारळ पाणी अतिशय फायद्याचे आहे.

थायरॉइड हार्मोन्सला संतुलित ठेवण्याचे काम नारळ पाणी करते. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने थायरॉइड हार्मोन्स नियंत्रित राहतात.