मैदानापाठोपाठ उमेश यादवची सोशल मीडियावरही धुलाई...

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या तोंडचा घास पळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात विजयासाठी 14 धावा करण्याचे आव्हान ठेवले. पण, उमेश यादवला ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवता आले नाही. 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर नेटकऱ्यांनी उमेश यादवला चांगलेच झोडपले.