टीम इंडियाचा आशिष नेहराला विजयी निरोप!

भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोप दिला.

मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

२००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे.

नवी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने आशिष नेहराला निरोप दिला.

यावेळी आशिष नेहराच्या घरातील सदस्यही आले होते.