टीम इंडियाने दणक्यात गाठली अंतिम फेरी

श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने बांगलादेशवर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

भारताकडून रोहित शर्माने 89 धावा फटकावत संघाच्या डावाला आकार दिला.

सुरेश रैनानेही 47 धावांची आक्रमक खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने भेदक मारा करत भारताचा विजय निश्चित केला.