टी-20 - भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

टी-२० मालिकेतील दुसऱ्या लढतीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

जासन बेहरेंडोर्फनं धारधार गोलंदाजी करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा निर्णय सार्थ ठरवला. बेहरेंडोर्फनं रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि पांडे यांना बाद करत भारताचे कंबरडेच मोडलं

अॅडम झम्पानं जम बसलेल्या केदार जाधव आणि धोनीला माघारी झाडत भारताच्या धावसंखेला खिळ बसवली

ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला आणि भारताला ११८ धावांपर्यंतच मजल मारता आली. केदार जाधवने सर्वाधिक २७ धावा केल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. बुमराहच्या गोलंदाजीवर विराट कोहलीनं वॉर्नरचा झेल पकडला. त्यानंतर जल्लोष करताना

पहिले दोन गडी लवकर माघारी परतल्यानंतर ट्रेविस हेड आणि हेन्रिकेज या खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करुन कांगारुंच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.