सेंच्युरियन कसोटीत भारत अडचणीत

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अडचणीत सापडला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताच्या आघाडीवीरांनी निराशा केल्याने दुसऱ्या दिवसअखेर भारताची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली आहे.

तत्पूर्वी जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव २५८ धावांवर आटोपला होता.

शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी २५२ धावांची आवश्यकता असून, खेळपट्टीवर उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजारावर भारतीय संघाची मदार असेल.