थरारक विजयासह भारताचा वनडे मालिकेवर कब्जा

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत भारताने न्यूझीलंडवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 2-1 ने कब्जा केला.

भारतीय संघाचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा सलग सातवा मालिकाविजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने फटकावलेली शतके.

फिरकी गोलंदाजांनी पाहुण्यांच्या फलंदाजीस घातलेली वेसण आणि शेवटच्या चार षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने केलेली भन्नाट गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली.

भारताने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने फटकावलेल्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडसमोर 338 धावांचे आव्हान ठेवले होते.