डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक विजय!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम विराटसेनेनं करून दाखवला. भारतीय संघाला 72 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे.