कपिल देवने १९८५ मध्ये तीन कसोटी सामन्याची मालिका ०-१ ने गमावलीमोहमद्द अजरुद्दीन कर्णधार असताना भारतीय संघ दोन वेळा श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. १९९३ मध्ये तीन कसोटी सामन्याची मालिका १-० ने जिंकली १९९८ साली झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही विजय मिळवला होता.सचिन तेंडुलकरने १९९७ मध्ये दोन कसोटी सामन्याची मालिका बरोबरीत राखली२००१ मध्ये सौरव गांगुलीने तीन सामन्याची मालिका २-१ ने गमावली२००८ मध्ये अनिल कुंबळेस तीन सामन्याच्या मालिकेस १-२ असा पराभव स्विकारावा लागला.२०१० मध्ये कॅपटन कूल एम.एस धोनीने तीन कसोटी सामन्याची मालिका १-१ अशी बरोबरीत राखलीयुवा कर्णधार विराट कोहली सध्या सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्यात कशी रणनीती आखतो आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे.