India vs New Zealand Memes: भारत-न्यूझीलंड सामन्याचा दिवस वाया गेल्यानंतर पडला मीम्सचा पाऊस, पाहा फोटो

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावांवर अंकुश ठेवला. न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा करता आल्या आणि त्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे उपांत्य फेरीचा सामन्याचा खेळ वाया गेल्याने निराश झालेल्या चाहत्यांना आज सामना होण्याची अपेक्षा आहे. आयसीसीच्या नियमानुसार आज सामना 46.1 षटकापासूनच पुढे सुरू होईल. त्यामुळे उर्वरित 23 चेंडूंत किवी किती धावा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.