भारताने श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवला दणदणीत विजय

नागपूर - भारताने श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. एक डाव आणि 239 धावांनी भारताने हा सामना जिंकला.

श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 166 धावात संपुष्टात आला. कर्णधार चंडीमलचा (61) अपवाद वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कालच्या 1 बाद 11 वरुन श्रीलंकेने डाव पुढे सुरु केल्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद झाले.

शंभर धावात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अखेरच्या षटकांमध्ये लकमलने थोडाफार प्रतिकार केला.