भारतानं न्यूझीलंडवर पहिल्यांदाच मिळवला दणदणीत विजय

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला.

भारताचा हा न्यूझीलंडविरोधातील पहिलाच विजय आहे. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता

. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत सामन्यावर कब्जा मिळवला.

भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना संधी दिली नाही.

भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 80 धावांची खेळी केली होती.