क्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच

दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यात मैदानात गाडी आली म्हणूव खेळ थांबवला गेला होता.

मैदानात मधमाश्या आल्यामुळे क्रिकेटचा सामना थांबवल्याचीही गोष्ट घडली आहे.

बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातील लंच ब्रेक 10 मिनिटे उशिरा घेण्यात आला. या गोष्टीला कारण ठरले होते ते मेनू कार्डचे. चुकीचे मेनू कार्ड छापल्यामुळे लंच ब्रेक 10 मिनिटे उशिरा घेण्यात आला होता.

फायर अलार्म वाजल्यामुळे ओल्ड ट्रॅफर्ड येथील सामना थांबवण्यात आला होता.

मैदानात अग्नीने पेट घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियातील एक स्थानिक सामना थांबवण्यात आला होता.