भारतासाठी इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना कठिण

आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सहा सामने झाले आहेत. या सहापैकी एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही

या मैदानात भारताच्या पराभवाची टक्केवारी 83 एवढी आहे.

या मैदानात भारताचा पहिला सामना 1967मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 132 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

या मैदानात भारताचा अखेरचा सामना 2011 साली खेळवला गेला होता. या सामन्यात भारताला एक डाव आणि 242 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

इंग्लंडने या मैदानात 50 कसोटी सामने खेळले आहेत. या 50 सामन्यांपैकी इंग्लंडने 27 सामने जिंकले आहेत, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.