बुद्धीबळ ते क्रिकेट... युजवेंद्र चहलचा प्रवास

भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख गोलंदाज युजवेंद्र चहलचा आज 29वा वाढदिवस.

23 जुलै 1990मध्ये जन्मलेल्या युजवेंद्रहे 2019मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या वन डे आणि ट्वेंटी -20 संघात पदार्पण केले.

क्रिकेटकडे वळण्याआधी युजवेंद्रनं जागतिक युवा बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

बुद्धीबळ खेळण्यासाठी प्रायोजक न मिळाल्यानं त्यानं क्रिकेटकडे मोर्चा वळवला.

2016-17च्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात युजवेंद्रनं 25 धावांत 6 विकेट घेत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला होता. ट्वेंटी-20त एकाच डावात पाच विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

युजवेंद्रनं 49 वन डे आणि 31 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 84 व 46 विकेट्स घेतल्या आहेत.