परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:40 AM2018-11-21T00:40:48+5:302018-11-21T00:41:37+5:30

यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Parbhani: The triumph of Rs 3 thousand by reaching the white jowar | परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोनपेठ तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पन्न होते. त्यामुळे ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात. सोनपेठ तालुका हा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात प्रमुख पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात.
तर रब्बी हंगामातील गहू व ज्वारी ही पिके दररोजच्या आहारातील भाकरीसाठी घेतली जातात. या भागातील शेतीवर निर्भर असणारे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करुन उत्पन्न घेतात; परंतु, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तो ही पहिल्या दोन महिन्यातच झाला. रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरणारा परतीचा पाऊस तालुक्यात झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारी व गहू ही पिके शेतकºयांनी घेतलीच नाहीत. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकºयांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली असली तरी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने साठवण स्त्रोतांमध्ये ठणठणात आहे. त्यामुळे पेरलेले उगवेल व उगवलेले जगेल, याची खात्री देता येत नाही.
गेल्या वर्षी १७०० ते २ हजार रुपये स्थिरावलेला ज्वारीचा दर गत तीन महिन्यांपासून वाढत आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ते ३५०० रुपयांवर ज्वारीचा भाव गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी निश्चित महाग झाली आहे.
जिल्ह्यात २१ टक्के ज्वारीची पेरणी
यावर्षी भर पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. त्यातच परतीच्या पावसानेही शेतकºयांना आकाशाकडेच बघण्याची वेळ आणली. दरवर्षी परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई व हरभºयाची पेरणी करतो. मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाण्याअभावी शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५९ हजार ७८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Parbhani: The triumph of Rs 3 thousand by reaching the white jowar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.