परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:49 AM2019-06-27T00:49:47+5:302019-06-27T00:50:11+5:30

: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

Parbhani: Receipt of loan of Rs 856 crore received in district | परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

परभणी: जिल्ह्याला मिळाली ८५६ कोटींची कर्जमाफी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़
२००९-१० पासून जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळी तर कधी नापिकी परिस्थिती ओढावत आहे़ त्यामुळे उसणवारी करून व बँकांकडूनपीक कर्ज मिळवून दरवर्षी शेतकरी रबी व खरीप हंगामामध्ये पेरणी करीत आहे़ पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कवडीचेही उत्पन्न लागत नाही़ परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ त्याचबरोबर बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही त्याच्या डोक्यावर वाढत आहे़
त्यामुळे बँकांनी पीक कर्ज देण्यास आखडता हात घेतला़ त्यानंतर शेतकºयाचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना व शेतकºयांकडून करण्यात आली़ या मागणीचा विचार करून राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली़ त्यानुसार २००९-१० पासून सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी २४ जून २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत या कर्जमाफी योजनेला मान्यता देण्यात आली़
२८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ची घोषणा करण्यात आली़ या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह लाभार्थी शेतकºयांचे दीड लाख रुपये कर्ज माफ करण्याचे ठरविण्यात आले़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांची दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, त्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजनाही अंमलात आणली़ त्यानुसार दीड लाखांपेक्षा अधिक असलेले कर्ज भरल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकºयांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम ३० जून २०१९ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात येत असल्याने यामध्ये राज्य शासनाने वाढ केली आहे़
त्यानुसार आता ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत या योजनेचा संबधितांना लाभ घेता येणार आहे़ त्यामुळे शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे़
बँकनिहाय पात्र ठरलेले लाभार्थी शेतकरी
४छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अलहाबाद बँकेने आतापर्यंत ३ हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे़ त्याचबरोबर अंध्रा बँकेने १ हजार २८१, अ‍ॅक्सीस बँकेने ३३ शेतकरी, बँक आॅफ बडोदा १ हजार ७५४, बँक आॅफ इंडिया १ हजार ७०२, बँक आॅफ इंडिया ८ हजार ९६०, कॅनरा बँक ९४२, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ६२२, देना बँक २ हजार १५७, एचडीएफसी ३३६, आयसीआयसीआय १५, आयडीबीआय ३९६ शेतकºयांना लाभ दिला आहे़
४इंडियन ओव्हरसीस बँक ३३८, पंजाब नॅशनल बँक १५१, सर्वाधिक स्टेट बँक आॅफ इंडिया ७८ हजार ४३८, सिंडीकेट २७९, युको १ हजार ३८०, युनियन बँक आॅफ इंडिया ९०५, सर्वात कमी विजया बँकेने एका शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ दिला आहे़ त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २२ हजार २११ तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २७ हजार २३२ अशा एकूण १ लाख ५२ हजार ७४६ शेतकºयांच्या खात्यावर ८५६ कोटी १६ लाख ३१ हजार ३०८ रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़

Web Title: Parbhani: Receipt of loan of Rs 856 crore received in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.