परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:14 AM2017-12-13T00:14:09+5:302017-12-13T00:14:24+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

In the Parbhani district, on account of 258 crore farmers of debt waiver | परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यातील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतकºयांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतकºयांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.
यासाठीची काही रक्कम जिल्ह्याला मिळाली आहे.
बँक निहाय शेतकºयांच्या खात्यावर जमा रक्कम
जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर शासनाने २५८ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाने १० हजार ७२८ शेतकºयांच्या खात्यावर ७३ कोटी ३८ लाख रुपये वर्ग केले आहेत. तसेच बँक आॅफ महाराष्ट्रने ४ हजार २७३ शेतकºयांच्या खात्यावर २७ कोटी ९७ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ३१६ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १८ लाख, युनियन बँकने ३२७ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी ४३ लाख, बँक आॅफ बडोदाने ३८१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १८ लाख, आंध्रा बँकेने ६२ शेतकºयांच्या खात्यावर २९ लाख, अलाहाबाद बँकेने २ हजार ५ शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी २७ लाख, कॅनरा बँकेने ६७४ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी ५८ लाख, देना बँकेने १७६ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी २५ लाख, इंडियन ओरसीस बँकेने ९९ शेतकºयांच्या खात्यावर ६८ लाख, सिंडीकेट बँकेने २१४ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख, युको बँकेने १ हजार ३८० शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ३७ लाख, विजया बँकेने १९३ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५० लाख तसेच सर्वाधिक महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १४ हजार १३६ शेतकºयांच्या बँक खात्यावर ८९ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.
प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतकºयांना फायदा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतकºयांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
कर्जमाफी योजनेअंतर्गत १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याला २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. परंतु, ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली नव्हती. १५ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकमत’ ने ‘जिल्ह्यात ६० कोटी रुपयांची कर्जमाफी ’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यासाठी २८७ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. ‘लोकमत’ने १० डिसेंबरच्या अंकात ‘जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी प्राप्त’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळालेली रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली.

Web Title: In the Parbhani district, on account of 258 crore farmers of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.