परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा गोंधळातच आटोपली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:33 PM2018-08-14T14:33:50+5:302018-08-14T14:36:53+5:30

रेडीरेकनरनुसार शेतकऱ्यांना बँकेतून पीक कर्जाचे वाटप करावे, ही मागणी लावून धरत शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

The general meeting of the district central bank was over | परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा गोंधळातच आटोपली 

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा गोंधळातच आटोपली 

Next

परभणी :  रेडीरेकनरनुसार शेतकऱ्यांना बँकेतूनपीक कर्जाचे वाटप करावे, ही मागणी लावून धरत शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला; परंतु, बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याची तसदी न घेताच ही सभा संपल्याचे जाहीर केल्याने शेतकरी संतप्त झाले होते़

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १४ आॅगस्ट रोजी बँकेच्या शेतकी भवनात १०१ वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेस बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, सुरेश वरपूडकर, आ़ तान्हाजी मुटकुळे, लक्ष्मणराव दुधाटे, करुणाताई कुंडगीर, बालाजी देसाई, विजयसिंह जामकर, हेमंतराव आडळकर, भगवान सानप, गयाबाराव नाईक, द्वारकाबाई कांबळे यांच्यासह बँक प्रशासन व परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेत संचालक सुरेश वरपूडकर यांनी बँकेच्या ठेवी, उचल, कर्ज व बँकेत उपलब्ध होणाऱ्या सुविधा त्याचबरोबर कामकाजासंबंधी माहिती दिली़ त्यानंतर शेतकरी सभासदांच्या वतीने शेतकऱ्यांना अद्यापही आपल्या बँकेतून नवीन पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही़ त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला

यावर संचालक मंडळाच्या वतीने पीक कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीक कर्जाचे वाटप करण्यात येईल, उत्तर देण्यात आले़ यावर शेतकरी सभासदांचे समाधान झाले नाही़ त्यातच काही शेतकरी सभासदांनी नवीन पीक कर्ज वाटप करताना रेडीरेकननुसार वाटप करणार का? असा सवाल संचालक मंडळ व बँक प्रशासनाला केला़ या प्रश्नावर संचालक मंडळ व बँक प्रशासन उत्तर देण्यास पुढे आले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांनी गोंधळ सुरू केला़ त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप 
बँकेचे संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी शेतकऱ्यांना शेतकरी सभासदांना समजविण्याचा प्रयत्न केला़ १० ते १५ मिनिटे झालेल्या भाषणानंतर काही शेतकरी सभासदांनी पुन्हा उठून आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या, उपस्थित केलेल्या प्रश्नाला बगल देऊ नका, असा पवित्रा घेतल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला़ त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने ही सभा संपल्याचे जाहीर केले़ या सभेत शेतकरी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर संचालक मंडळ देऊ शकले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये बँकेच्या कारभाराविषयी संताप होता.

Web Title: The general meeting of the district central bank was over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.