मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 03:00 AM2017-10-19T03:00:00+5:302017-10-19T03:00:00+5:30

मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं यालाच तर म्हणतात दिवाळी..यंदा आपल्या मनात हा यशाचा दिवा उजळू दे..

Light of light .... Light and light in the dark darkness and walk the light path | मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

मूठभर प्रकाश....मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं आणि प्रकाशाची वाट चालणं

Next

Our greatest weakness lies in giving up. The most certain way to succeed is always to try just one more time.” - Thomas Edison
दिव्याचा शोध लावणारा एडिसन. या मुलाला काहीही येत नाही असं लेबल त्याच्या शिक्षकांनी त्याच्यावर चिकटवलं होतं. ‘स्टुपिड’ अशी पदवीच त्याला शाळेनं बहाल केली होती. काहीच धड जमत नाही म्हणून त्याच्या पहिल्या दोन नोकºया गेल्या. कामावरून काढून टाकलं गेलं त्याला. पुढे दिव्याचा शोध लागला. त्यावेळेस त्यानं सांगितलं की, एक हजारवेळा मी हा दिवा उजळवण्याचा प्रयत्न केला; पण काही जमलं नाही. तेव्हा त्याला कुणी विचारलं की म्हणजे तू हजारवेळा अपयशी ठरला होतास?
त्यावर एडिसन म्हणाला, हजारवेळा अपयश नाही आलं तर या हजार पद्धतीनं हा दिवा लागत नाही हे मला कळलं..
आता सांगा, ज्या जगानं एडिसनला स्टुपिड ठरवलं ते जग, आपल्याला जिनिअस ही पदवी सहज देऊन टाकेल का?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न.
हजारवेळा अपयश येऊनही आपल्याला हवं ते काम करण्याइतपत पेशन्स आपल्यात आहे का?
आपण रडतोच फार..
किती कारणं सांगतो, हे झालं म्हणून ते झालं आणि ते झालं नाही म्हणून हे झालं नाही..
साधं उशिरा पोहचण्याचं उदाहरण घ्या..
आपलं अपयशच ते, वेळेवर न पोहचण्याचं..
पण आपण पटकन म्हणत नाही की, उशिरा उठलो म्हणून उशीर झाला..
आपण फुटकळ कारणं सांगतो, पाऊस होता, गाड्या लेट, ट्राफिक जाम..
म्हणजे आपल्या अपयशाचं खापर आपण सतत दुसºयाच्या डोक्यावर फोडायला पाहतो..
ज्याला अपयश स्वीकारता येत नाही, तो यश काय स्वीकारणार?
म्हणजे पहा..
प्रश्न काहीही असो, अपयश कशातूनही येवो आपण त्यासाठी जबाबदार घटकांची यादी घेऊनच फिरतो..
असं नाही म्हणत की, चुकलं माझंच काहीतरी, नाही जमलं मला, अंदाज फसला, कुवत कमी पडली, तयारी कमी पडली, क्षमता वाढवायला हवी..
हे नाहीच..
आपण सतत इतरांकडे बोट दाखवतो..
कधी आपले पालक, कधी आर्थिक परिस्थिती, कधी समाज आणि कुणी नाहीच भेटलं तर देव आणि नशीब आहेतच..
त्यांना दोष देऊन मोकळं व्हायचं..
परिणाम?
आपलं अपयश संपत नाही..
आणि मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही..
अपयश म्हणजे काही आपल्यावरचा डाग नव्हे..
उलट हारलो म्हणजे निदान आपण त्या खेळात तरी होतो हे सिद्ध होतं..
हरणं वाईट नाहीच; पण त्या अपयशातून आपण किती पटकन उभे राहिलो यावर पुढची जित ठरते..
धोनी सिनेमात एक प्रसंग आहे..
शालेय क्रिकेटच्या काळातला..
युवराज सिंगच्या संघाविरोधात हरण्याचा..
धोनी सांगतो, पता है हम मॅच कहां हारे? बास्केटबॉल कोर्ट पर?
कारण त्याचे सहकारी युवराजचा तामझाम पाहून तिथंच मनोमन पत्करतात की, याच्यापुढे आपला निभाव नाही..
हे धोनीला कळलं म्हणून तो हरला नाही आणि हरला तरी संपला कधीच नाही..
हे उभं राहणं जमेल आपल्याला?
का नाही?
दिवाळी हेच तर सांगते..
मिट्ट अंधारात दिवा होऊन उजळणं
आणि प्रकाशाची वाट चालणं
यालाच तर म्हणतात दिवाळी..
यंदा आपल्या मनात हा यशाचा
दिवा उजळू दे..
हीच प्रार्थना..

Web Title: Light of light .... Light and light in the dark darkness and walk the light path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.