दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:00 PM2018-11-15T18:00:00+5:302018-11-15T18:00:02+5:30

येत्या 18 तारखेला ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’

16 people accidental deaths every hour | दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देगाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या या कथा कशा टाळता येतील?

मनीषा म्हात्रे

रोज सकाळी वर्तमानपत्रं उघडलं की रस्ते अपघाताची बातमी कळते. तरुण कुणीतरी त्यात जीव गमावून बसलेलं असतं. कुणीतरी त्यात आपला मित्र असतो, कुणी सगासोयरा. जीव कळवळतो. आयुष्यभरासाठी माणसांना गमावून बसण्याची आफत ओढावते. आणि हळहळ करण्यापलीकडे हातात काहीही उरत नाही. जगभरात हे चित्र आहेच; पण भारतात ते अधिक विदारक आहे.
येत्या 18 तारखेला जगभर या रस्ते अपघात जनजागृतीसाठी एक दिवस साजरा केला जाणार आहे. गेली 10 वर्षे जगभरातले अनेक देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत यादिवसानिमित्त जनजागृती करतात. ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ असं या दिवसांचं नाव. आणि त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’
अशा अनेक रस्ताकथा आपल्या सगळ्यांकडे असतात, गाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या.
त्या टाळता येतील का?
टाळायला हव्यात कारण या देशातली रस्ते अपघातांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.


महाराष्ट्रात चित्र काय?

वाहनचालकांच्या निष्काळजीमुळे राज्यात 2017 मध्ये 
35, 853 अपघात झाले.

 12,264 
जणांना त्यात जीव गमवावा लागला. 
 20,465 जण गंभीर जखमी झाले.

 जानेवारी ते मार्च  2018 
या केवळ तीन महिन्यांत 
9264 अपघात झाले.
3361 जणांचे मृत्यू झाले. 
यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण शहरी भागातील अपघातांच्या जवळपास तिप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसते. घडलेले सर्व अपघात वाहनचालकांची निष्काळजी, धोकादायक ओव्हरटेक व अविचार, हयगयीने वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. 
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यात 1 हजार 324 अपघातग्रस्त ठिकाणं असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात दिली होती. 

2017 साली भारतात 
4,64, 910
रस्ते अपघात झाले.

1,47, 913
लोकांनी त्यात आपले
जीव गमावले.

405 माणसं
दर दिवशी देशात सरासरी
रस्ते अपघातात बळी पडतात.


1,290 माणसं 
रोज अपघातात जखमी होतात. 

16
माणसं दर तासाला
रस्ते अपघात मरतात.

Web Title: 16 people accidental deaths every hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.