हिंदू हिंसक नसते, तर रामायण-महाभारत घडलं नसतं- सीताराम येचुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 11:15 AM2019-05-03T11:15:23+5:302019-05-03T11:24:41+5:30

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारताच्या ग्रंथांचा हवाला देत हिंदू हिंसक असल्याचं म्हटलं आहे.

who says hindus cant be violent sitaram yechuri | हिंदू हिंसक नसते, तर रामायण-महाभारत घडलं नसतं- सीताराम येचुरी

हिंदू हिंसक नसते, तर रामायण-महाभारत घडलं नसतं- सीताराम येचुरी

Next

नवी दिल्लीः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारताच्या ग्रंथांचा हवाला देत हिंदू हिंसक असल्याचं म्हटलं आहे. गुरुवारी भोपाळच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले, संघाचे स्वयंसेवक या ग्रंथांचं उदाहरण देतात आणि सांगतात हिंदू हिंसत नाहीत. याच्या मागे नक्की काय तर्क आहे, विशेष धर्माची लोकच हिंसा करतात काय ?, हिंदू हिंसा करत नाहीत काय?, असा प्रश्न येचुरींनी उपस्थित केला आहे.

येचुरी पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची 'खासगी आर्मी' तयार करत आहे. परंतु विरोधकांचं गठबंधन मोदींना सत्तेतून पायउतार करेल. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते. दिग्विजय म्हणाले, ही सामान्य लोकसभेची निवडणूक नव्हे, तर संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजपानं संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नाही. ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचंही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: who says hindus cant be violent sitaram yechuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.