जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:33 PM2017-12-29T16:33:21+5:302017-12-29T16:42:11+5:30

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे.

In a way the public is our boss - Rahul Gandhi | जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

Next
ठळक मुद्देगुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले.काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ​​​​​​​

नवी दिल्ली- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असे त्यांनी मत मांडले आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा राग-द्वेष संपवणारी वितारधारा आहे, ही विचारधारा प्रेमभाव ठेवणारी आणि संयम, शिस्तीने बोलणारी आहे. या विचारधारेला आपल्याला वाढवायचे आहे, असा संदेश राहुल यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

गुजरात निवडणूक हा शिकण्याचा मोठा अनुभव होता असे सांगत राहुल यांनी राजकीय नेत्यांचे लोकांशी असलेल्या नात्यावरुन त्यांच्या क्षमतेचा अंदाज येत असतो, असेही स्पष्ट केले. काँग्रेसपक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल यांची या दोन निवडणुकांबाबतची मते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.




राहुल या निवडणुकांबाबत म्हणतात, " गुजरातच्या निवडणुकीमधून मी एक शिकलो. आपल्या पक्षाने एकत्रितरित्या व चांगल्यापद्धतीने लढा दिला. अर्थात हिमाचल प्रदेशमध्ये असाच लढा देता आला नाही हे मला मान्य आहे. लोकांच्या आकांक्षांनुसार काम करणारेच चांगले राजकीय नेते होतात हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे." आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है " अशा प्रकारे राहुल यांनी या निवडणुकांचे मुल्यमापन करुन पक्षाला पुढील दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यांना आपण लोकांपर्यंत घेऊन गेले पाहिजे. जे या निवडणुकीत यशस्वी झाले त्यांचे मी अभिनंदन करतो असेही या चिंतनामध्ये त्यांनी मत व्यक्त केले.



 

Web Title: In a way the public is our boss - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.