सक्तवसुली संचलनालया(ईडी)ने 15 महिन्यांत 12 हजार कोटींची संपत्ती केली जप्त

By sachin.khutwalkar | Published: July 30, 2017 08:36 PM2017-07-30T20:36:00+5:302017-07-30T20:36:52+5:30

सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने गेल्या १५ महिन्यात जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

sakatavasaulai-sancalanaalayaaidainae-15-mahainayaanta-12-hajaara-kaotaincai-sanpatatai-kaelai | सक्तवसुली संचलनालया(ईडी)ने 15 महिन्यांत 12 हजार कोटींची संपत्ती केली जप्त

सक्तवसुली संचलनालया(ईडी)ने 15 महिन्यांत 12 हजार कोटींची संपत्ती केली जप्त

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 30 - सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने गेल्या १५ महिन्यात जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. गेल्या १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त करण्यात आली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे. संसदेत शुक्रवारी एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नमूद केले की गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या करदात्यांवर अस्थायी अथवा तात्पुरते जप्ती आदेश जारी केल्यानंतर ईडीने ११0३२.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
सक्तवसुली संचलनालय (ईडी)च्या अधिकृत वेबसाईटनुसार आर्थिक वर्ष २00५ ते २0१५ च्या दरम्यान जप्त केलेली संपत्ती जवळपास ९ हजार कोटींची आहे. ईडीने चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ९६५.८४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली. दरम्यान आर्थिक गुन्ह्यांची नोंद असलेले विजय मल्ल्या यांच्या संपत्तीवर टाच आणायला सक्त वसुली संचलनालयाने प्रारंभ करताच २0१६/१७ वर्षात या आकडेवारीत अचानक मोठी भर पडली. या कालखंडात विजय मल्ल्या यांची १0 हजार कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली. तामिळनाडूतही काही ठिकाणांवर ईडीने धाडी घातल्या. शेखर रेड्डी प्रकरण त्यात सर्वात महत्वाचे आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सक्त वसुली संचलनालयाच्या उच्चपदस्थांनी आपल्या अधिकाºयांना आदेश बजावले आहेत की देशात जिथे कुठे चुकीच्या मार्गाने पैसे कमवल्याची माहिती प्राप्त होईल, त्या पैशांवर व संपत्तीवर बिनदिक्कत धाडी घाला व आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करा. या कारवाईत आयकर विभाग, सीबीआय व सक्तवसुली संचलनालयात पुरेपूर समन्वय राहिल, याची काळजी सर्व विभागांनी घेतली आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानेही बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी याच काळात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती उपरोक्त तीनही यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे. ज्या बनावट कंपन्यांनी विविध मार्गाने परदेशात परस्पर पैसे पाठवले, त्यांच्या विरोधातही ईडीने वेगवान कारवाई चालवली आहे. एप्रिल २0१७ मधे चेन्नईच्या एका ३६ वर्षिय तरूणाला ईडीने अटक केली. या तरूणाने आपल्या ६ बोगस कंपन्यांव्दारे ७८ कोटींची रक्कम परदेशात पाठवली होती.

Web Title: sakatavasaulai-sancalanaalayaaidainae-15-mahainayaanta-12-hajaara-kaotaincai-sanpatatai-kaelai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.