...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:59 PM2019-02-02T13:59:34+5:302019-02-02T14:02:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.

PM Narendra Modi's criticism on Mamata Banerjee | ...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला

...म्हणून 'दीदी' हिंसेवर उतरल्या तर; नरेंद्र मोदींचा टोला

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. 

कोलकाता- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर रॅलीमध्ये ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं. आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचं नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेलं नाही, हे देशाचं दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.


बांगलादेशातून आलेल्या मटुआ समुदायातील जनतेला उद्देशून मोदी म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे तुकडे करण्यात आले. सांप्रदायिक दंग्यांमुळे लोकांवर अत्याचार झाले. बांगलादेश आणि पाकिस्तानातून लोकांना पळून आश्रयासाठी भारतात यावं लागलं. आम्ही नागरिकत्वाचा कायदा आणला आहे. संसदेत हा कायदा मंजूर होऊ द्यात, त्यामुळे जनतेला त्यांचा अधिकार मिळेल, असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे. आपल्या देशात अनेकदा शेतकऱ्यांबरोबर कर्जमाफीचं राजकारण खेळलं जातं. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत होता, ते काही वर्षांनंतर पुन्हा कर्जबाजारी होत होते.
आता राज्यांमध्ये कर्जमाफीच्या नावे मत मागण्यात आली. ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज अद्याप माफ झालेलं नाही आणि ज्याचं झालंय त्यांना फक्त 13 रुपयेच मिळाले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या या घटना आहेत.
आमचं सरकार शेतकऱ्यांचं जीवन आनंदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे एक सुरुवात आहे. जेव्हा नवं सरकार बनवल्यानतंर पूर्ण अर्थसंकल्प येईल, तेव्हा शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी आम्ही काय उपाययोजना केल्यात याचं चित्र स्पष्ट होईल.

Web Title: PM Narendra Modi's criticism on Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.