नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील, साध्वी प्रज्ञा सिंह बरळल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:04 PM2019-05-16T15:04:47+5:302019-05-16T15:08:17+5:30

भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

'Nathuram Godse was a 'deshbhakt', is a 'deshbhakt' and will remain a 'deshbhakt' - Sadhvi Pragya Singh | नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील, साध्वी प्रज्ञा सिंह बरळल्या 

नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील, साध्वी प्रज्ञा सिंह बरळल्या 

googlenewsNext

भोपाळ - भाजपाच्याभोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ''नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.




दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला होता.  

Web Title: 'Nathuram Godse was a 'deshbhakt', is a 'deshbhakt' and will remain a 'deshbhakt' - Sadhvi Pragya Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.