नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 08:50 AM2019-01-05T08:50:50+5:302019-01-05T13:32:55+5:30

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.

narendra modi is worst leader after independence says punjab cm captain amarinder singh | नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

Next
ठळक मुद्देपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे.नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी हे वक्तव्य केले आहे.अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय असंही म्हटलं आहे.

चंदीगढ - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (4 जानेवारी) हे वक्तव्य केले आहे.

'गेल्या पाच वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक आश्वासन सांगावं' असं  आव्हान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. मोदींनी गुरुवारी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ‘नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. लोकांनाही आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’ असं सिंग यांनी म्हटले आहे. 

अमरिंदर सिंग यांनी 'नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय' असंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसनेपंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत’.

Web Title: narendra modi is worst leader after independence says punjab cm captain amarinder singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.