अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 03:46 PM2017-09-17T15:46:33+5:302017-09-17T15:50:20+5:30

सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले.

Many of the difficulties came, but on the outskirts of Sardar Sarovar stood - Prime Minister Narendra Modi | अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दभोई (गुजरात), दि. 17 -  सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले.
 दरम्यान, नर्मदा महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना मोदींनी सरदार सरोवर हे बांधकामाचा अप्रतिम नमुना असून, हे सरोवर म्हणजे देशाला मिळालेली मोठी देणगी असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "विश्वकर्मा जयंतीदिवशी हे धरण देशाला अर्पण करणे म्हणजे या धरणाचे बांधकाम करणाऱ्यांचे स्मरण आहे. जर सरदार पटेल आणि डॉ. आंबेडकर जर काही वर्षे अधिक जीवित राहिले असते तर हे धरण 60 किंवा 70 च्या दशकातच बांधून पूर्ण झाले असते."
यावेळी या धरणाच्या बांधकामामध्ये आलेल्या अडचणींचाही मोदींनी उल्लेख केला."या धरणाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र या सर्व अडचणींवर मात करत धरण उभे राहिले,"असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या आदिवासींच्या आठवणीही मोदींनी जागवल्या. ते म्हणाले,"काही लोकांना वाटते की केवळ मुठभर लोकांनीच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. मात्र आदिवासींच्या त्यागाचे विस्मरण झाले आहे."
56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी भूमिपूजन केलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.  दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पूर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.  
या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.

Web Title: Many of the difficulties came, but on the outskirts of Sardar Sarovar stood - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.