खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:12 AM2017-12-15T05:12:05+5:302017-12-15T05:12:05+5:30

If false promises are over, return to Delhi - eat Shatrughan Sinha; Modi, Amit Shah | खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

googlenewsNext

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा यांना उद्देशून केले आहे. ट्विटमध्ये खा. सिन्हा म्हणतात की, ‘वन मॅन शो व टू मॅन आर्मी’ला माझी विनंती आहे की, प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी विधाने व आश्वासने संपली असतील तर कृपया दिल्लीला परत यावे. सर्व केंद्रीय मंत्री व गुजरातमध्ये इतके दिवस बसलेल्या केंद्र सरकारनेही आता परतायला हवे.

टाळी कर्णधाराला...
आपण विजयी झालो तर याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल, हे आम्हाला माहीत आहे; पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करून सिन्हा यांनी ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’ या म्हणीचा उल्लेखही केला आहे. गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला तशी अपेक्षाही आहे, असेही खासदार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: If false promises are over, return to Delhi - eat Shatrughan Sinha; Modi, Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.