हरयाणामध्ये धुक्यामुळे 50 वाहनांचा अपघात, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:21 PM2018-12-24T14:21:47+5:302018-12-29T11:08:40+5:30

हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

Haryana: 7 killed in 50 vehicle pileup on Rohtak-Rewari highway due to dense fog conditions | हरयाणामध्ये धुक्यामुळे 50 वाहनांचा अपघात, 7 जणांचा मृत्यू

हरयाणामध्ये धुक्यामुळे 50 वाहनांचा अपघात, 7 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे.

नवी दिल्ली : हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हायवेवर वेगाने येणाऱ्या दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर त्यामागे असलेली इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.



 

Web Title: Haryana: 7 killed in 50 vehicle pileup on Rohtak-Rewari highway due to dense fog conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.